शिरूर प्रतिनिधी:
शिरूर बायपासवरील संग्राम हॉटेलसमोर आज मंगळवार दि.११/०८/२०२६ रोजी संध्याकाळी ५च्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात वाडेगव्हाण येथील उद्योजक तथा सरपंच किशोर यादव यांच्यासह मोटारसायकलस्वार प्रथमेश प्रकाश लाड रा. कुंडल ता. पलूस जि. सांगली यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती शिरूर पोलिसांनी दिली आहे.

या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिरूर बायपासवरील संग्राम हॉटेलसमोर किशोर यादव हे इंडेवर कार मधून प्रवास करीत होते. यावेळी एका कंटेनरने त्यांच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली,त्यानंतर पुणे-नगर मार्गावर धावणाऱ्या शिवाई बस (MH-49-BZ-8060) नेही अपघातग्रस्त कारला धडक दिली.

या भीषण अपघातात कारमधून प्रवास करणारे वाडेगव्हाणचे उद्योजक तथा सरपंच किशोर यादव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच डिव्हायडर पास करून दुसऱ्या रोड वर जाण्या साठी थांबलेल्या मोटारसायकलस्वार प्रथमेश प्रकाश लाड यांचाही अपघातात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. अपघाताची नेमकी कारणे तसेच घटनेची सविस्तर माहिती तपासानंतर स्पष्ट होतील.
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत





Users Today : 225
Users Yesterday : 787