शिरूर प्रतिनिधी -सुदर्शन दरेकर
शिरूर शहरात मंगलमूर्ती नगर येथे बकरी ईद निमित्त आणलेला बोकड चोरी झाल्याची घटना घडली असून याबाबत
फिर्यादी जावेद अब्दुलगणी शेख (रा. मंगलमुर्तीनगर, शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक 26 मे 2026 रोजी रात्री 2.30 ते सकाळी 6.45 वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या घरासमोरून सुमारे 70 हजार रुपये किमतीचा चॉकलेटी-पांढऱ्या रंगाचा बोकड चोरीला गेला. याशिवाय रमीज नजीर शेख, जमीर सय्यद, मन्सूर मेहबूब अन्सारी व तौसीफ युसुफ खान यांच्या बोकडांचीदेखील चोरी झाल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी चौकी ईश्वर भोसले, आर्यन एअरफोर्स पवार, सोहम रामु भोसले आणि देवदास जीवदास काळे (सर्व रा. पाण्याची टाकी, शिरूर) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साबळे करीत असून प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.




Users Today : 0
Users Yesterday : 184