शिरूर प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणजे घोडगंगा साखर कारखाना, गेले अनेक महिन्यापासून कामगारांचे पगार थकवले गेल्यामुळे कारखाना बंद पडला आहे. कामगारांनी स्वतःच्या घामाच्या कामाचा पैसा मिळवण्यासाठी आंदोलन करत, चिमणीवर चढून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यावेळी विद्यमान चेअरमन ऋषिराज पवार यांनी दोन पगार देऊ असे आश्वासन दिल्यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेत कारखाना चालू केला होता.त्यावेळी मशिनरी ला साधे ग्रीस नव्हते की रॉड ही नसताना, कामगारांनी कारखान्याला 32कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यास मदत केली, त्या कर्जातून कामगारांना त्यांचा थकीत पगार व कामगारांनी मृत कामगारांसाठी आपला एक दिवसाचा पगार ठेवलेली थकबाकी देण अपेक्षित होते,परंतु
त्या मिळालेल्या कर्जातून ऊस तोडनी कामगार व ऊस उत्पादकांना पैसे देण्यात आले, कामगारांना थोडे पैसे देत, काम चालु करुन घेतले व शिल्लक राहिलेले पैसे काय झाले हे आजपर्यंत ही संचालकांनी किंवा चेअरमनने उपोषण करणाऱ्या व खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवून परत उपोषण अर्धवट ठेवत काम चालू करून कागदपत्रांवर सह्या करून कर्ज मिळविले, त्यांना सांगण्याचे कष्ट ही घेतले नाहीत. त्यांचा हेतू फक्त आपल्याला आपली कामधेनु चालू करने व हळूहळू आपला पगार देण्यात यावा हा होता.
तसे नसते तर मागील विधानसभेच्या वेळी विद्यमान आमदारांसाठी घरचा डबा खाऊन प्रचार करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले नसते, असे आज भाऊक होत कामगारांनी आपल्या व्यथा सांगत आपल्या उपोषण काळात बायका मुलांनी आम्हाला जेव्हा उपोषणची साथ दिली त्यावेळेस विद्यमान चेअरमन ऋषीराज पवार यांनी बायका मुलांना घेऊन तमाशा करता असे उद्गार काढले. आज पत्रकार परिषदेत बोलत असताना तात्या शेलार यांनी रोखठोक उत्तर देत येत्या पंधरा दिवसात कारखाना प्रशासनाला जागा दाखवून देऊ.
कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, त्यांनी तेंव्हा साखर आयुक्तांकडे या सर्व प्रकारांची माहिती देत न्याय मागितला, तर त्यांनी सरळ उत्तर दिले, हे प्रशासन फार जाड कातडीचे आहे, तुम्ही कोर्टात जा, असे सांगितले.पण जिथे खायला महाग, मुलांच्या फी, हॉस्पिटल, मुलींची लग्न, शिक्षण हे करण्यास असमर्थ ठरणारा कामगार कोर्टात कुठून पैसे भरणार ? हे कामगार जन्मताच चेअरमन सारखे सोन्याच्या चमच्याने जेवण करणारे नाहीत ?
घोडगंगा साखर कारखान्यात कामगारानी कॅश क्रेडिट वर प्रत्येकी पाच ते सात लाख रूपये घेतले आहे, त्याला कामगार साखळी पदधतीने एकमेकाला जमीनदार आहेत, पगार थकले गेल्या मुळे कर्जाचा भुधनड पडला आहे व त्यांचे सिविल खराब झाले आहे. ह्या गोष्टीमुळे हतबल झाला आहे.
अशावेळी कोणत्याही साखर कारखान्याच्या चेअरमनचे कर्तव्य असते की आपला कामगार सुखात आहे की दुःखात आहे त्याला काही गरज आहे का? हे पाहणे, पण विद्यमान चेअरमन व मा. चेअरमन हे साध्या आमच्यापर्यंत भटकतही नाही व कोणाला विचारपूस करायला पाठवत नाही हे आमचं दुर्दैव. त्यांनी फक्त अजितदादा पवारांवर कारखाना बंद पाडण्याचे खापर फोडण्यावर स्वतःही लक्ष केंद्रित केले आहे व आमच्यातील एका स्वयंघोषित कार्यकर्त्याला ही असे करण्यास सांगितले आहे.जो कार्यकर्ता वाटेल तसे व्हिडिओ बनवतो व सगळीकडे पसरत आहे,फक्त अजित दादांची बदनामी कशी होईल याकडेच लक्ष देतो आहे.
आज शिरूर येथील पत्रकार परिषद ही कारखान्यातील सर्व कामगारांच्या वतीने तात्यासाहेब शेलार, महेंद्र काशीद, संपत कोहकडे यांनी कारखान्याचे झालेली दुरव्यवस्था व कारखान्यावर असणारे कर्ज व घोडगंगा साखर कारखाना बंद पडण्यास कारणीभूत फक्त आणि फक्त आमदार अशोक बापू पवार व ऋषीराज पवार आहे, हे सांगितलं. कारण गेली 25 वर्ष एक हाती सत्ता फक्त पवार यांचीच आहे व त्यांनी हे जाणून बुजून करत आमची सर्वांची अशी आवस्था करून ठेवली आहे. विशेष म्हणजे या सर्वात त्यांचा स्वतःचा खाजगी कारखाना आजही जोमात व नफ्यात चालू आहे , अशा भावना व्यक्त केल्या व झाले गेले विसरून लवकरात लवकर कारखाना चालु करावा व त्या साठी अम्ही मदत करू अशा भावना व्यक्त केला.
