बकोरी प्रतिनिधी:
पुणे येथील चंद्रकांत वरघडे यांच्या वनराईत,बकोरी गावातील महिलांनी एक अनोखी आणि प्रेरणादायी वटपौर्णिमा साजरी केली.
या पवित्र दिवशी १५१ वडाची झाडे लावून पर्यावरण संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल त्यांनी उचलले.वडाची झाडे लावून त्याचे पुजन करण्यात आले.झाडांच्या पूजनाने आणि भक्तीभावाने वातावरण भारावले गेले.हे दृश्य फक्त एक उत्सव नव्हते, तर पृथ्वीच्या रक्षणासाठी आणि आपली पर्यावरणप्रेमी भावना साकार करण्यासाठी एक महान प्रयत्न होता.
वारघडे यांनी आलेल्या महिलांना वडाच्या झाडांचे महत्त्व आणि त्यांचे पर्यावरणीय फायदे सांगितले सर्व महिलांनी भविष्यातील पिढ्यांसाठी एक सुंदर संदेश दिला आहे.
आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि एकत्रित प्रयत्नांमुळे आपले गाव आणि पर्यावरण अधिक सुंदर आणि हरित होईल याची खात्री आहे. चला, आपण सर्वजण या प्रेरणादायी उपक्रमातून शिकून, आपल्या परिसरात आणि जीवनात हरित क्रांती घडवूया अशाप्रकारचा एक संदेश देण्याचा प्रयत्न याठिकाणी या सर्व महिलांनी केला.
बकोरी देवराई ,वनराई प्रकल्पात दरवर्षी अशाप्रकारे वडाचे झाडांचे वृक्षारोपण करुण पुजा केली जाते. आजपर्यंत वनराई ५५००० पेक्षा जास्त देशी झाडांचे वृक्षारोपण केले आहे. एक कोटी झाडे लावण्याचे स्वप्न असल्याचे वारघडे यांनी सांगितले.
तसेच बकोरी परीसरात १०० कोटी लीटर पाणी जमिनीत जीरवण्याचे स्वप्न असल्याचे ही वारघडे यांनी सांगितले ,त्यापैकी यावर्षी १ कोटी लीटर क्षमतेचा छत्रपती जलाशयाचे काम पुर्ण करण्यात आले आहे.यावर्षी २१००० झाडे लावली जाणार आहेत, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन वारघडे यावेळी यांनी केले.
आज वनराईत एकुण ७५२ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले त्यामध्ये मास्टर कार्ड कंपनीचे कर्मचार्यांनी सकाळी वृक्षारोपण केले व संपुर्ण दिवसभर परीसरातील अनेक गावांतून महीलांनी येऊन वनराई वृक्षारोपण केले व वटपोर्णिमेचा सन साजरा केला. बकोरी गावच्या उपसरपंच सौ.पुनम सुनील वारघडे यांनी आलेल्या महिलांचे स्वागत केले तसेच हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महीला अध्यक्ष सौ सुरेखा भोरडे यांनी सर्व महिलांनी वृक्षारोपण, पर्यावरण रक्षणासाठी काम करण्याची गरज असल्याचे सांगितले.
पारंपारीक गाणी व घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
