शिरूर प्रतिनिधी:
शिरूर नगर पालिका मार्च महिना आहे म्हणून जोमाने कर वसुली करत आहे.
विशेष म्हणजे नगर पालिकेत कामाला असणारा प्रत्येक जण चार दोन जणांचे टोळके घेऊन प्रत्येक इमारत,प्रत्येक घरात जाऊन,घरात कोण आहे ते न पाहता घरपट्टी कधी भरता ,की तुमचे नळ कनेक्शन कट करू अशा प्रकारे धमकी देत आहेत.
मार्च महिना व त्यात कॉलेज च्या फी भरण्याच्या टप्यात नागरिकांना हा नवीन सावकर समोर आला असल्याने काय करावे ते कळत नाही.
घरपट्टी नाही भरली तर उन्हाळ्यात पाणी नाही भेटणार,नगर पालिकेतील साधा कर्मचारी असला तरी त्याची बोलण्याची पद्धत सावकर व फायनस कंपन्या पेक्षा ही बेकार असल्याची चर्चा शिरूर शहरात सुरू आहे.
शिरूर मुख्याधिकारी प्रितम पाटील यांना भेटणे व फ़ोन करणे अशक्य आहे,कारण ते त्यांच्या वेळे नुसार येतात व फ़ोन स्वीकारतात, अशी चर्चा आहे.
कर भरण्या साठी आम्हाला थोडा कालावधी द्या,या साठी कुणाला भेटावे?कारण कर वसुली व नळ कनेक्शन कट करण्याची धमकी देणारे नगर पालिका कर्मचारी काहीच ऐकण्याच्या स्थितीत नाहीत.त्याना फक्त टारगेट पूर्ण होणे गरजेचे दिसते आहे.यामुळे घरात असणाऱ्या महिलांना नाहक मनस्ताप होत आहे, आज नाही तर उद्या आम्ही घरपट्टी भरणार आहोत मग ही सावकारकी का?शिरूर शहरात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.आता सर्व नेते ,नगरसेवक व सभागृह नेते व आमदार , खासदार कुठे गेले?
कोरोना काळात बऱ्याच नगर पालिकानी कर माफी केली आहे ,मग शिरूर नगरपालिका का काही करू शकली नाही याबाबत.
विकास नावाने फक्त बोंबाबोंब असणाऱ्या शिरूर मधे एवढी सक्तीची वसुली का सुरू आहे?हा प्रश्न गोरगरीब नागरिकांना पडला आहे.
नागरिकांना त्रास देऊन वसुली करत पुरस्कार तर मिळवायचा नाही ना?
