कोरेगाव भीमा प्रतिनिधी:विनायक साबळे
शिरूर हवेली मतदार संघांतील वाघोली येथे जवळ जवळ दहा वर्षा च्या प्रतिक्षे नंतर दिनांक 9/02/2025रोजी भव्य दिव्य बैल गाडा शर्यतीचे, भैरवनाथ केसरी व भैरवनाथ उत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ,भैरवनाथ यात्रे निमित्त आयोजन करण्यात आलेले आहे.
या संपूर्ण घाटाचे नियोजन बद्ध काम वाघोलीतील कैलास गुलाबराव सातव यांनी केले आहे.
दहा वर्षा नंतर पुन्हा स्पर्धा होणार असल्याचे सांगत, करण सातव यांनी घाटाला पूर्वीचा काहीच आकार नसल्याचे ही सांगितले व पूर्णतः नवीन रूपात घाटाचे काम स्वतः दिवस दिवस भर उभे राहून केले असल्याचे त्यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा च पाहिल्या बक्षिसात थार गाडी दिली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांका बरोबर रोख स्वरूपात मोठ्या प्रमाणात बक्षीस देण्यात येणार असल्याचे यात्रा कमिटी व आयोजकांनी सांगितले.
दि. 9,10 व 11 रोजी सिरियल ,तर दि.14रोजी मेघफायनल होणार असून,चार ही दिवस शर्यतीतील भाग घेणाऱ्या बैल गाडा मालकाना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे .
या बैल गाडा शर्यतीत भाग घेणाऱ्या मालकाना नाव नोंदवण्या साठी टोकन फी तीन हजार रुपये आहे तर गाडा जुपल्यानंतर अडीच हजार लकी ड्रा पद्धतीने स्वतः गाडा मालकास परत मिळणार आहेत.
