शिरूर प्रतिनिधी
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गणपतराव काळकुटे, शिवदुर्ग प्रेमी, मा. सरपंच कासारी हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व राष्ट्रगीताने झाली तसेच संस्थेमार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी बोलताना गणपतराव काळकुटे यांनी आजच्या तरुण पिढीने देशाच्या उभारणीसाठी काय केले पाहिजे .
तसेच शिवरायांपासून प्रेरणा घेऊन आपण बऱ्याचशा गोष्टी साध्य करू शकतो हे देखील सांगितले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री स्व. बापूसाहेबजी थिटे यांच्या आठवणींना देखील त्यांनी उजाळा दिला, तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र थिटे , सचिव धनंजय थिटे, संचालक डॉ . हर्षवर्धन थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था अतिशय वेगाने प्रगती करत आहे व नावलौकिक मिळवत आहे हेही त्यांनी नमूद केले.
या वर्षीपासून संस्थेमध्ये बापूसाहेब थिटे कॉलेज ऑफ नर्सिंग या महाविद्यालया मार्फत जी एन एम व बीएससी नर्सिंग हे दोन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.
देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शेतकरी बांधवांना अन्नधान्याची पूर्तता करण्यासाठी अधिकाधिक पीक घेणे तसेच आहे त्याच जमिनीवर प्रतिहेक्टरी उत्पादन वाढविणे अनिवार्य आहे. परंतु असे असले तरी ज्या पद्धतीने रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढला आहे त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर जमिनीवर व समाजाच्या आरोग्यावर दिसून येत आहे. दिवसेंदिवस जमिनीची उपजाऊ क शक्ती कमी होत आहे, जमिनीतील सूक्ष्म जीवांची संख्या घटून त्या मृतप्राय झालेले आहेत, तसेच समाजामध्ये कॅन्सर सारखे दुर्धर आजार तयार झालेले आहेत. म्हणूनच सेंद्रिय खतांचा अधिकाधिक वापर शेतीत करने हे खूप महत्त्वाचे आहे.
गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे त्यावर या पुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे हीच गरज ओळखून संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉ. राजेंद्रजी थिटे साहेब यांनी सेंद्रिय शेती व गांडूळ खताचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी संरक्षणम् गांडूळ खत निर्मिती प्रकल्प व प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.
दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी या नवीन प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सौ काव्य राजेश दातखिळे, संचालिका, कृषीकाव्या गांडूळ खत निर्मिती प्रकल्प व प्रशिक्षण केंद्र, दातखिळेवाडी तालुका जुन्नर या उपस्थित होत्या.
उद्घाटन कार्यक्रमानंतर त्यांनी गांडूळ खत तयार कसे करावे व त्याचे शेतीसाठी असणारे महत्त्व सर्व शिक्षक व विद्यार्थी यांना पटवून दिले.
या उद्घाटन समारंभासाठी समन्वयक श्री शिवाजीराव पडवळ सर, डी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अमोल शहा सर, बी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . द्वारकादास बाहेती सर, विजयमाला इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सौ मारिया साठे मॅडम, विजयमाला जुनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स चे प्राचार्य संतोष पोटे सर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
