शिरुर प्रतीनीधी :
शिरूर तालुक्यातील करडे पाचर्णेवस्ती येथील गोविंद आबासाहेव वाघमारे यांना स्थानिक शिरूर पोलिसांकडून अन्याय होऊन दमदाटी होत असल्याने न्याय मिळण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली असून न्याय न मिळाल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करून आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोविंद वाघमारे याची शिरूर ग्रामीण येथे जमीन गट नं 985/2/1 मध्ये पत्रा घर बांधलेले आहे. दिनांक २१ जुलै २४ रोजी नितीन मच्छिंद्र पाचर्णे व अनिल यमाजी पोटावळे यांसह पंधरा ते विस व्यक्तींनी सदर घरातील कामगार अतुल चांदने व युनुस भोसले यांना दमदाटी करून मारहाण करून संपुर्ण घर जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त केले, यावेळी त्याने ११२ ला कॉल केल्यावर शिरूर पोलिस स्टेशनचे गणेश पालवे घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत सदर व्यक्ती घर उध्वस्त करून निघून गेले होते.
त्याबाबत गोविंद वाघमारे शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो असता पोलिस ठाणे आमलदार यांनी पिआय साहेबांना भेटा त्यानंतर तुमची तक्रार घेऊ असे त्यास सांगण्यात आले व तक्रार घेतली नाही गोविंद वाघमारे यांनी पि. आय. गुंजवटे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु दोन/ तीन दिवस झाले तरी भेट होत नसल्याने रांजणगावातील डीवायएसपी यांना भेटून सर्व हकीकत सांगितल्याने डीवायएसपी साहेबांनी गुंजवटे यांना संबंधीतावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.

त्यानंतर शिरूर पोलिसांनी फक्त एन.सी. दाखल करून घेतली याबाबत त्यांना विचारणा केली असता पि.आय.साहेबांनी तु कोण हे ठरवणारा जास्त शहानपाणा करू नको नाहीतर तुझ्यावर गुन्हा दाखल करीन अशी धमकी दिल्याचे गोविंद वाघमारे यांनी अर्जात नमूद केले
तसेच घर पाडणा-या व्यक्तींना राजकीय वरदहस्त असल्याने पोलिस त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप गोविंद वाघमारे यांनी केला असून
संबंधीत व्यक्तींवर योग्य गुन्हा दाखल करावा व मला न्याय मिळावा तसेच दिरंगाई करण्याऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी अन्यथा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करून आत्मदहन करण्याचा इशारा गोविंद वाघमारे यांनी दिला असून सर्वस्व जवाबदारी पोलिस आय. गुंजवटे साहेब यांची राहील अशी लेखी तक्रार पत्राद्वारे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.






Users Today : 5
Users Yesterday : 9