राळेगण थेरपाळ (ता. पारनेर) : सुदर्शन दरेकर
शिवमुद्रा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, राळेगण थेरपाळ यांचा भव्य कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राजकीय, सहकारी, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी विविध वक्त्यांनी पतसंस्थेच्या कामकाजाचे कौतुक करताना संस्थेचे चेअरमन पंकज कारखिले यांच्या कार्यशैलीचा विशेष गौरव केला.
कार्यक्रमास माजी खासदार सुजयदादा विखे पाटील, आमदार काशिनाथ दाते, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथदादा कोरडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, भाजप तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे, दूध संघाचे अध्यक्ष दत्ता नाना पवार, पंचायत समिती सभापती गणेश शेळके, माजी नगराध्यक्ष विजय औटी, सहायक निबंधक विकास जाधव, जिल्हा परिषद सदस्य सचिन वराळ, सुभाष दुधाडे, वसंत चेडे, उद्योजक सुरेश पठारे, भाऊसाहेब खिलारे, दीपक ठोंबरे, दादाभाऊ वारे, बाबाजी लंके, राजूशेठ औटी, सरपंच लहू भालेकर, नीलेश खोडदे, पै. युवराज पठारे, सरपंच बाळासाहेब रेपाळे, सुषमा रावडे (राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्षा), सोनाली सालके (भाजपा तालुका अध्यक्षा), डॉ. श्रीकांत पठारे (शिवसेना तालुका अध्यक्ष), राजेंद्र वाघमोडे, लाभेश औटी, अंकुश गुंजाळ, जनसमृद्धी पतसंस्थेचे चेअरमन बन्सी बढे, व्यवस्थापक राजेश गोपाळे, व्हा. चेअरमन शरद गोपाळे, पांडुरंग बढे, रोहिदास मेसे, असिफ इनामदार, विकास सेवा संस्थेचे चेअरमन दत्तात्रय कारखिले, माजी सरपंच पोपटशेट कारखिले, शिवा काका खिलारी, लोकनियुक्त सरपंच आदींसह गावातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी खासदार सुजयदादा विखे पाटील म्हणाले, “राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीने राजकारण करावे, मात्र पतसंस्था चालवताना सर्वांनी जबाबदारीने आणि पारदर्शकतेने कार्य केले पाहिजे.” त्यांनी पंकज कारखिले यांच्या कामाचे कौतुक करत राळेगण थेरपाळच्या चेहरा मोहरामध्ये ते आमूलाग्र बदल घडवत असल्याचे सांगितले. “त्यांच्या बरोबर आम्ही सदैव आहोत” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी पतसंस्थेच्या भक्कम आर्थिक कामकाजाचे व पारदर्शक व्यवस्थापनाचे कौतुक केले. नव्या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक सक्षमतेकडे नेणारे हे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मत अनेक वक्त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन उत्तम प्रकारे पार पडले असून, उपस्थित ग्रामस्थांनी याला भरभरून प्रतिसाद दिला.
