Breaking News
रांजणगाव सांडस येथील शितोळे वस्ती, मळई वस्ती चा पुरामुळे संपर्क तुटला. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाची सतर्कता; ३० जणांची सुटका, २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर नागरिकांना आवाहन पुणे–मुंबई तसेच मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. रामविलास पासवान यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त शिक्रापूरमध्ये विविध उपक्रम गुरुकुल वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना नाश्ता व महिनाभराचा किराणा सुपूर्द मांडवगण फराटा येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली; नागरिकांची प्रचंड गर्दी, स्टंटबाज फोटोग्राफीमुळे जीवितास धोका *विश्रांती हॉस्पिटलकडून बालकांच्या कर्करोगासाठी निःशुल्क उपचार योजना सुरू* *आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील बालरुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, औषधे, केमोथेरपी व रेडिएशन थेरपी पूर्णपणे विनामूल्य*

रामविलास पासवान यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त शिक्रापूरमध्ये विविध उपक्रम गुरुकुल वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना नाश्ता व महिनाभराचा किराणा सुपूर्द

Facebook
Twitter
WhatsApp

शिक्रापूर, प्रतिनिधी: विनायक साबळे

लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) लेबर सेल, महाराष्ट्र राज्य व राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने पूर्व केंद्रीय मंत्री, पद्मभूषण स्व. रामविलास पासवान यांची ८० वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

Screenshot

शिक्रापूर येथील आशीर्वाद ट्रस्ट संचलित गुरुकुल वस्तीगृह व अनाथ आश्रम येथे हा कार्यक्रम झाला. सुरुवातीला स्व. पासवान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना पौष्टिक नाश्ता देण्यात आला. संस्थेला एका महिन्यासाठी लागणारा किराणा देखील सुपूर्द करण्यात आला. गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष शरद टेमगिरे, उपाध्यक्ष शाम भाऊ लांडे, उद्योजक शुभम शेवाळे, प्रहार संघटनेचे शिरूर तालुका कार्याध्यक्ष व पत्रकार संदीप डाखुळकर, उद्योजक आबासाहेब गिलबिले, दर्शन टेमगिरे, प्रणव टेमगिरे, तसेच गुरुकुल वस्तीगृहाचे संस्थापक/अध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी शरद टेमगिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. ते म्हणाले की, “स्व. रामविलास पासवान साहेबांनी संपूर्ण राजकीय कारकिर्दीत दलित, गरीब, वंचित, शोषित, कामगार आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला. सामाजिक न्याय आणि समान संधीसाठी त्यांचे योगदान प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत गरजू घटकांच्या सेवेसाठी असे उपक्रम सतत राबवले जातील. समाजसेवा हीच त्यांना खरी आदरांजली आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 2 4 4 2
Users Today : 92
Users Yesterday : 92