शिरूर प्रतिनिधी
रामलिंग रोड येथील जय हनुमान मित्र मंडळाचा गणपती म्हणजेच”विघ्न हर्ता”
गेली चौदा वर्षे वेगळ्या स्वरूपात अनेक समाज उपयोगी कामे करत, आपले वेगळे पण साकारत, जय हनुमान मित्र मंडळाचा विघ्न हर्ता आता पंधराव्या वर्षी त पदार्पण करत असताना ,२०२४ च्या गणपती विसर्जनाच्या वेळी महाराष्ट्र बरोबर संपूर्ण भारतात होणाऱ्या महिला भगिनींवर होणाऱ्या अत्ाचारा बाबत दोषी असणाऱ्या गुन्हे गराणा फाशी देण्यात यावी व महिला , मुलींना न्याय मिळवून देण्या साठी आव्हान करत , ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली.
या मिरवणूकीत मोठ्या संख्येने महिला मुली सहभागी झालेल्या दिसत होत्या, त्याच बरोबर महिलांनी पारंपरिक पद्धतीने फुगड्या व नृत्य करत आपला आनंद व्यक्त केला.
जय हनुमान मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ थोरात यांच्या मार्गद्शनाखाली ,विजय थोरात ,अध्यक्ष संजय थोरात ,उपाध्यक्ष ऋषिकेश राजळे ,शुभम राजळे ,दर्शन दुधाने ,हृतिक दुधाने ,राज दुधाने ,मुकुल शर्मा ,संकेत भगत ,अमन मिश्रा ,शंतनू जठार ,ऋषिकेश कातोरे, विवेक वीर ,संतोष चाळके ,भावार्थ कुलकर्णी ,तेजस चाळके यांनी या कार्यक्रमा चे आयोजन केले.






Users Today : 110
Users Yesterday : 26