तर घोडगांगा साखर कारखाना एक वर्षाच्या आत सुरू करणार: प्रवीण दरेकर

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:

दि. 6 मे रोजी शिरूर तालुक्यातील न्हावरा या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटना आयोजित प्रचार सभेत अनेक पक्षीय मान्यवर उपस्थित होते.
या प्रचार सभेत आवर्जुन उपस्थित असणारे प्रवीण दरेकर यांनी , उपस्थित असणाऱ्या नागरिकांना आताची निवडणूक ही साधी सुधी नसून आपल्या देशाचा कारभार कोणी चालवायचा व आपण मतदान करत तो कोणाच्या हातात द्यायचा, हेआपल्या सर्वांच्या हातात आहे ,म्हणून मतदान विचारपूर्वक करा.
नरेन्द्र मोदी यांनी शेतकरी व गरीब जनतेसाठी कायम वेगवेगळ्या योजना द्वारे मदत केली आहे.
आपण सर्वांनी शिवाजी आढळराव यांना निवडून दिले तर मी एक वर्षाच्या आत घोडगंगा साखर कारखाना सुरू करेल व ऊस तोडणी कामगार, ऊस उत्पादक शेतकरी व कारखान्यावरील सर्व कामगार यांना न्याय मिळवून देईल अशी ग्वाही दिली व दादा जर निवडून आले, तर शिरूर तालुक्याचा विकास झाल्या शिवाय राहणार नाही, असे हि ते बोलले.

या प्रचार सभेत मंगलदास बांदल यांनी आमदार अशोक पवार यांनी दम असेल तर समोर यावे, मग हिशोब केला जाईल असे आपल्या भाषणात सांगितले. त्यांचा स्व मालकीचा कारखाना जोमात व घोडगगां बंद का? हे उत्तर द्यावे. कोल्हेनीं पाच वर्षांत एक हि काम केले नाही, असे अनेक आरोप हि त्यांनी यावेळी केले.
या प्रचार सभेत नाथा भाऊ शेवाळे, आबासाहेब सोनवणे, रवी बापू काळे,शिवाजी कुराडे, शरद कालेवार व महायुतीमध्ये सहभागी असणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शिवाजी आढळराव पाटील यांनी उपस्थित असणाऱ्या नागरिकांना मलाच का मतदान करायचे तर मागील काही कामे वर्षानुवर्ष तशीच पडून आहेत, ती पूर्ण करण्यासाठी, ती रोड ची असो की रेल्वे मार्ग असो, अशा अनेक कामा साठी मला निवडूण येऊन ती करायची अहेत व गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी, आपण सर्वांनी विश्वास ठेवत, मला निवडूण द्यावे ही विनंती केली.

दौलत नाना शितोळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपण आपल्या रामोशी बेडर बेरड समाजात जन्माला आलो म्हणून त्यांच्या मागण्या पूर्ण करत कामाला सुरुवात केली व यात यात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला मदत केल्यामुळे मी समाजाबाबत असणारे माझे कर्तव्य पूर्ण करू शकलो व मृत्यूपर्यंत मी पोहोचलो असतानाही परत जीवन जगण्याची व समाजासाठी काहीतरी करण्याची एक उम्मीद निर्माण झाली व ती पूर्ण ही झाली. म्हणुन माझ्या सर्व समाज बांधवांनी समाज व उपस्थित नागरिकांनी शिवाजी आढळराव पाटील यांना मतदान करत निवडून द्यावे, असे आवाहन केले.

या प्रचार सभेत मोठ्या प्रमाणात रामोशी बेडर बेरड समाज व कार्यकर्ते उपस्थित होते.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 7 8
Users Today : 12
Users Yesterday : 9