शहाण्या बाबाची कहाणी

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
प्रसिद्ध बालसाहित्यिक फारूक एस. काझी हे सांगोला येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
नेहमीच बालसाहित्यात रममान असलेल्या फारूक काझी यांनी बालसाहित्यात आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. लहान मुलांना रुचेल आणि पचेल अशा प्रकारच्या बालसाहित्य निर्मितीवर त्यांचा भर असतो.

बालकांच्या भाविश्वाशी निगडित आशय, विषय आणि प्रसंग त्यांच्या साहित्यात पहावयास मिळतात. त्यामुळे त्यांचे साहित्य कधी मुलांना आपलेसे करते हे कळत देखील नाही. अशाच एका साहित्य प्रवासाचा एक आगळावेगळा भाग म्हणजे शहाण्या बाबाची कहाणी.

आजपर्यंत बालसाहित्यिकांनी बालसाहित्यात कथा, कविता, कादंबरी आणि नाट्यछटा अशा प्रकारचे विविध लेखन केले आहे. परंतु प्रयोगशील शिक्षक व बालसाहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेले फारूक काझी यांनी बालक आणि पालक यातील सुसंवाद आपल्या लेखणीतून शब्दबद्ध केला आहे.
तो पालकांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल याची खात्री वाटते. केवळ अंदाजे किंवा कल्पनेच्या आधारे काही न लिहिता स्वतः अनुभव घेऊन त्यांनी हा लेखाजोखा खास पालकांसाठी बनवला आहे. जेणेकरून कोणताही पालक आपल्या पाल्याला समजण्यात चुकी करणार नाही. त्याला व्यवस्थित समजून घेऊन नंतरच त्याच्याबद्दल अनुमान बांधील.

त्यामुळे दोघात होणाऱ्या गैरसमजाची दरार काझी यांनी भरून काढली आहे .

लहान मुले ही खूपच संवेदनशील असतात. अगदी एक-दोन वर्षाच्या मुलालाही मान अपमान कळतो. एखाद्या फुलाप्रमाणे त्यांचे बालपण हे समृद्ध होत असते. त्यामुळे आपल्या चुकीच्या वागण्यामुळे त्यांचे बालमन दुखावणार नाही, याची काळजी प्रत्येक पालकाने घेतली पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला येत नसेल तर ती किती आनंदाने ते आपल्याला समजून सांगतात आणि आपण मात्र एखादी गोष्ट त्याला येत नसेल तर त्याच्यावर ओरडतो. यासाठीच मुलांना समजून घेणे खूप महत्त्वाचे असते. स्वानुभव आणि बालमानसशास्त्र यांचा सुरेख मेळ घालत काजी यांनी प्रत्येक लेख अगदी जबाबदारीने लिहिले आहे. आदर्श पालक बनण्यासाठी हे पुस्तक नक्कीच एक मार्गदर्शक दीपस्तंभ ठरेल, यातून पालक आणि बालक यांचा दुरावा कमी होऊन एक मैत्रीचे नाते निर्माण होईल, फक्त पालक, मालक नव्हे या पहिल्याच लेखात लेखकाने सुजाण नागरिकांना आदर्श पालक बनण्याचा मार्ग दाखवला आहे.

केवळ उपदेशाचे डोस न पाहता आपल्या अनुभवातून मुलांना कसे समजून घेता येईल, याचे उत्तम दाखले लेखकाने पालकांना मूल समजून घेण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक दिले आहेत.

यात पावडरच्या डब्याच्या मदतीने अलफाजने अंगणापासून सडकेपर्यंत काढलेला तुटक तुटक रेषांचा पट्टा त्याच्या मनातील विचार सांगून जातो. रहदारीचे नियम बाबांनी पाळावे याचा अट्टहास करणाऱ्या आपल्या मुलाचा हेतू बाबांनी जर ओळखला नसता तर पुढील काळात निश्चितच अशा प्रकारचा दूरदृष्टी विचार त्याने भविष्यात कधी केला नसता. या उदाहरणातून मुलांना ओळखणे किती महत्त्वाची असते हे लक्षात येते.

पालक मित्रांनो, असे वेगवेगळे अनुभव लेखकाने आपल्या लेखणीतून शब्दबद्ध केले आहेत. ते पालक म्हणून आपल्याला भविष्यकाळात नक्कीच उपयोगी पडतील. या अनुभवांच्या खजिना आपल्या पाल्याचे आयुष्य समृद्ध करणार आहे. त्यामुळे हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा. पुणे येथील हरिती पब्लिकेशन्सने या पुस्तकाची साजेशी बांधणी केली आहे. पुस्तकाची गुणवत्ता आणि पानांचा दर्जा त्यांनी केलेल्या मेहनतीची साक्ष देतो. प्रसिद्ध चित्रकार अन्वर हुसेन, यांनी विषयाला अनुरूप काढलेले आकर्षक मुखपृष्ठ पुस्तकाच्या उंचीत मोलाची भर टाकते. तसेच बालमानसशास्त्र आणि मेंदू आधारित बालशिक्षणाच्या अभ्यासक डॉ. श्रुती पानसे यांनी या पुस्तकाला अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिली आहे. तर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बालाजी मदन इंगळे यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे. असे उपयुक्त पुस्तक प्रत्येक सुजाण पालकाने आपल्या ग्रंथालयात जरूर ठेवावे. मा. फारूक एस. काझी यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा.

[सचिन बेंडभर पाटील
कार्यकारणी सदस्य,
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था.]

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 1 4 3
Users Today : 81
Users Yesterday : 503