शिरूर शहरातील अंतर्गत रस्त्याच्या दुरवस्थेबाबत व त्यातून होणारया अपघातांबाबत ,लेखी निवेदन शिरूर नगर पालिकेस,मनसे च्या पदाधिकारी यांनी देत,गेल्या अनेक वर्षांपासून शिरूर शहरातील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झालेली व सदरच्या बाबत अनेक वेळा अनेकांनी,आंदोलने, उपोषणे, निवेदने देखील देऊन झालेली आहेत व त्यानंतर यावर तात्पुरता स्वरुपात रस्त्यांना मलमपट्टी देखील करण्यात आलेली आहे.
आजही त्याच पद्धतीची मलमपट्टी पहावयास मिळत आहे. सदरच्या रस्त्याबाबत “पाबळ फाटा ते विद्याधाम शाळा इतपर्यंतचा रस्ता थ्री स्टार पद्धतीचा व शहराला शोभा देणारा केला आहे” परंतु, याउलट जर आपण पहिले तर “पाबळ फाटा ते रिलायन्स पेट्रोल पंप बायपास इथपर्यंतचा व विद्याधाम शाळा ते सतराकमानी पूल ह्या रस्त्यावर मात्र अन्याय झाल्याचे चित्र” दिसत आहे.
सदरच्या रस्तावरील पडलेल्या खड्ड्यांबाबत अद्यापर्यंत कोणतेही ठोस पावले उचलली गेली नाहीत, तात्पुरता स्वरूपात डागडुजी करून सदरचा रस्ता पुन्हा नागरिकांना वहिवाट करून दिली जातो.
परंतु सदरच्या रस्त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघणे गरजेचे व नागरिकांच्या आरोग्याशी तसेच त्याचे जीवनाशी निगडीत आहे.
शिरूर शहरातील अंतर्गत रस्त्याच्या चाळणी मुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे व अनेक लोकांना यामुळे कायमचे अपंगत्व देखील स्वीकारावे लागले आहे. सदरच्या खड्ड्यांमुळे नागरिक इतके त्रस्त झाले आहेत की त्यांना त्यांचा जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे . शिरुर शहरातील रस्त्यावरून चालत असताना जीवन – मृत्यू च्या दोरीवर चालण्यासारखे झाले आहे. त्यातूनच मोठ्या गाड्या ह्या मागचा पुढचा विचार न करता भरधाव वेगाने गाड्या चालवत आहेत व अशा वेगाने चाललेल्या गाड्याने अपघात होण्याची कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. तसेच या रस्तावरून ये – जा करणाऱ्या शिरूर शहरातील नागरिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लहान मुलांना बागेत घेऊन येणे, वॉकींग करण्यासाठी बाहेर पडणे, इतर कार्यक्रमासाठी सदरच्या खड्डे पडलेल्या रस्त्याने प्रवास करणे खूप महाग झाले आहे.
या खड्डे पडलेल्या व चाळण झालेल्या रस्त्यामुळे खूप मोठ्या अपघाताला नागरिकांना सामोरे जाण्याची भीती निर्माण झालेली आहे व खड्डे पडलेल्या रस्त्याने वाहन वळवताना देखील सर्रास अपघात होतानाचे चित्र रोज दिसत आहे.
ही बाब अत्यंत गंभीर व नागरिकांच्या जीविताशी तसेच आरोग्याशी निगडीत आहे. ह्या खराब, चाळण झालेल्या, गतिरोधक नसणाऱ्या, पाणीसाठा होणार्या खड्ड्यांमुळे खूप मोठी जीवितहानी होण्याची तसेच नाहक बळी जाण्याची देखील शक्यता दिसून येत आहे.
रस्त्याची झालेली दुरवस्था तात्काळ बदलावी. ह्या १५ दिवसांमध्ये सदरच्या रस्त्याचे काम फास्टट्राक वर करण्यात यावे व होणारी मोठी दुर्घटना टाळावी व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी विनंती मनसे ने निवेदना द्वारे केली.
तसेच या खड्ड्याबाबत आम्हाला “मोठे जन आंदोलन उभारावे लागेल व होणार्या प्रत्येक घटनेस तसेच अपघातास आपण व आपले कार्यालय व संबधित अधिकारी जबाबदार असेल”.
असे निवेदन निवेदन देताना ,शिरूर जनहित विधी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील माळवे ,विधिचे ॲड.कैलास गाडीलकर, ॲड.प्रतीक लोखंडे, मा. शहाराध्यक्ष संदिप कडेकर , शाम पवार, विकास बोरुडे, मिलिन परदेशी, परेश सूपते, समद काझी व आदी कार्यकर्ते यांनी शिरूर नगर पालिकेच्या सहाय्यक अधीक्षक सौ. काळे मॅडम व साळुंके साहेब यांना याबाबतचे निवेदन दिले.
